Sakshi Sunil Jadhav
दु:ख हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असते. मात्र त्यातून कसे सावरायचे आणि मानसिक शांतता कशी टिकवायची, याबाबत प्राचीन तत्त्वज्ञानी चाणक्य यांनी अत्यंत मोलाचे विचार मांडले आहेत.
चाणक्यांच्या मते दु:ख टाळणे पूर्णपणे शक्य नसले तरी योग्य विचारसरणी आणि आचरणातून त्याचा परिणाम कमी करता येतो. चाणक्यनीतीत सांगितलेले काही महत्त्वाचे मुद्दे आजही तितकेच लागू पडतात.
जास्त अपेक्षा ठेवल्या की निराशा वाढते. अपेक्षा मर्यादित ठेवल्याने मन शांत होतं.
राग, लोभ आणि मत्सर यांवर नियंत्रण ठेवले तर अनेक दु:खांना आळा बसतो.
चुकीच्या लोकांच्या सहवासामुळे जीवनात अडचणी वाढतात. योग्य मित्रांची निवड महत्त्वाची आहे.
पैशाचे योग्य नियोजन नसेल तर ताण वाढतो. कमाईपेक्षा जास्त खर्च टाळणे गरजेचे आहे.
आपल्या वैयक्तिक गोष्टी सर्वांशी शेअर करू नयेत. गुपित उघड झाल्यास अडचणी निर्माण होऊ शकतात.
वेळ वाया घालवल्यास पश्चात्ताप होतो. योग्य वेळी योग्य निर्णय घेतल्यास संकटे टाळता येतात.
स्वाभिमान गमावल्यास मानसिक वेदना वाढतात. आत्मसन्मान टिकवून ठेवल्यास आत्मविश्वास वाढतो.
शिक्षण, अनुभव आणि संयम यामुळे कठीण प्रसंगातही योग्य मार्ग सापडतो.