Sakshi Sunil Jadhav
चाणक्य नीतीनुसार कर्ज, शत्रू आणि आजार दीर्घकाळ दुर्लक्षित केल्याने ते मोठ्या संकटाचं कारण बनतं.
जंगलातील आग जशी चंदनालाही जाळते, तसंच दुष्ट आणि वाईट प्रवृत्तीचे लोक कोणालाही हानी पोहोचवू शकतात. म्हणून संगत निवडताना सतर्क राहा.
अडचणीच्या काळात जे लोक तुमच्या सोबत उभे राहतात, तेच खरे मित्र असतात. संकटात मदत करणाऱ्यांची साथ महत्त्वाची ठरते.
धैर्य नसेल तर यश शक्य नाही. संयम आणि सहनशीलता ठेवणारा व्यक्तीच आयुष्यात प्रगती करू शकतो, असं चाणक्य सांगतात.
शंभर खुशामत करणाऱ्यांपेक्षा एखादा थोडा कठोर पण प्रामाणिक सल्ला देणारा माणूस भविष्यात जास्त उपयोगी पडू शकतो.
"आजचा कबूतर उद्याच्या मोरापेक्षा चांगला" या नीतीचा अर्थ म्हणजे आज जे आहे त्यात समाधान मानणं हेच खरं धन आहे.
वाईट स्वभावाच्या व्यक्तीला कितीही सन्मान दिला तरी तो नुकसानच करतो. जसं आग डोक्यावर ठेवली तरी जाळतेच.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.