ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
आचार्य चाणक्य हे भारतीय इतिहासातील महान तत्त्वज्ञ आणि विचारवंत होते, त्यांनी जीवन जगण्यासाठी अनेक नैतिक तत्त्व दिली.
व्यक्ती, कुटुंब, संस्था, समाज इत्यादींनी कसं वागलं पाहिजे आणि त्या सर्वांची कर्तव्यं याचा सविस्तर उल्लेख चाणक्यांनी सांगितला आहे.
आचार्य चाणक्य विवाह सोहळा आणि लग्न करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला पाहिजेत याची माहिती दिलीये.
विवाह हे एक आदर्श सामाजिक-धार्मिक नातं असून हा एक आध्यात्मिक अनुभव असल्याचं, चाणक्यांनी म्हटलंय.
आचार्य चाणक्यांनी म्हटलंय की, वैवाहिक संबंधांमध्ये पती-पत्नीमध्ये जास्त वय असू नये. हे लक्षात घेतलं पाहिजे.
शारीरिकदृष्ट्या सक्षम पुरुषच पत्नीच्या शारीरिक आकांक्षा पूर्ण करू शकतो. अशा वेळी नवरा मोठा असेल तर तो पत्नीला मानसिक आणि शारीरिक सुख देऊ शकत नाही.
पत्नीची इच्छा पूर्ण झाली नाही तर ती पुरुषाकडे आकर्षित होण्याचा धोका असतो. त्यामुळे वैवाहिक जीवन उद्ध्वस्त होऊ शकते.