Sakshi Sunil Jadhav
आजच्या स्पर्धेच्या युगात प्रत्येकाला यशस्वी व्हायचे आहे. मात्र काही वेळा आपल्या प्रगतीत अडथळा ठरणारे लोक हे आपल्याच आसपास असतात. त्यांना ओळखणं गरजेचं आहे.
जशी सोन्याची शुद्धता तपासली जाते, तसाच माणसाचा स्वभाव त्याच्या त्याग, ज्ञान त्याच्या कृतीतून दिसतं.
जो व्यक्ती खूप गोड बोलतो तो नेहमीच प्रामाणिक असेलच असे नाही. ‘विषकुंभ पयोमुखम्’ म्हणजे वरून गोड पण आतून विषारी असू शकतो.
धोकेबाज लोक तुमच्या समोर स्तुती करतात, पण तुमच्या गैरहजेरीत वाईट बोलतात. अशा लोकांपासून अंतर ठेवा.
स्वार्थी लोक तुमच्या कमतरता जाणून घेतात आणि योग्य वेळी त्याचा फायदा घेतात.
चाणक्य म्हणतात, एखाद्याला छोटा मोह दाखवा. तो जर तुमच्या हिताला धक्का देत असेल तर तो विश्वासू नाही.
आपले गुपित सर्वांना सांगू नका. गुपित जाणणारा खोटा मित्र शत्रूपेक्षा अधिक धोकादायक असू शकतो.
जो अडचणीच्या वेळी साथ सोडतो, तो कधीही आपला हितचिंतक नसतो. कडवे सत्य सांगणारा मित्रच खरा असतो.
चाणक्यांच्या मते, जंगलात सरळ झाडे आधी तोडली जातात. त्यामुळे जीवनात शहाणपण आणि चातुर्य आवश्यक आहे.