Sakshi Sunil Jadhav
आजच्या जगात खोटं बोलणं सामान्य झालं असलं, तरी आचार्य चाणक्यांनी खोटं आणि खरं ओळखण्याचे सोपे पण प्रभावी उपाय सांगितले आहेत.
चाणक्य म्हणतात, डोळे मनाचा आरसा असतो. खोटं बोलताना लोकं नजर चुकवतात, वारंवार इकडे-तिकडे पाहतात किंवा पापण्या सतत उघडझाप करतात.
जर समोरचा व्यक्ती बोलताना सतत खाली बघत असेल किंवा नजर स्थिर ठेवू शकत नसेल, तर तो काहीतरी लपवतोय.
खोटं बोलणाऱ्यांचं हसणं फक्त ओठांपुरतंच मर्यादित असतं. डोळ्यांत आनंद नसतो. चेहरा ताणलेला, जबडा घट्ट किंवा ओठ थरथरत असतील, तर हे खोटेपणाचं लक्षण मानलं जातं.
चाणक्य नितीनुसार खोटं बोलताना व्यक्ती अस्वस्थ होतात. त्यामुळे वारंवार ओठ चाटते, गळा साफ करतात किंवा तोंड झाकण्याचा प्रयत्न करतात.
हात-पाय हलवणं, बोटं मोडणं, हात घासणं, खांदे उडवणं किंवा मान मागे घेणं हे सर्व खोटेपणाचे संकेत आहेत. सत्य बोलणारी व्यक्ती शांत आणि स्थिर असते.
चाणक्य सांगतात की खोटं बोलताना पाय अस्वस्थ होतात. पाय हलणं, बोटं वाकडी होणं किंवा जागेवर तडफडणं हे मानसिक तणावाचं लक्षण आहे.
खोटं बोलणारी व्यक्ती आधी एक आणि नंतर वेगळी गोष्ट सांगते. ती अनावश्यक जास्त माहिती देते, जेणेकरून तिची गोष्ट खरी वाटावी.