ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दरवर्षी श्रावण महिन्यात रक्षाबंधन हा सण साजरा केला जातो. या वर्षी ९ ऑगस्ट रोजी हा सण साजरा केला जाईल.
या दिवशी अनेक परंपरा पाळल्या जातात. या दिवशी ओवाळणीच्या ताटात कोणत्या गोष्टी ठेवणे शुभ मानले जाते, जाणून घ्या.
राखी ओवाळणीच्या ताटात कुंकू ठेवणे शुभ मानले जाते. कुंकूला दिर्घायुष्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते.
ओवाळणीच्या ताटात तांदूळ ठेवणे शुभ मानले जाते. रक्षाबंधनाची ओवाळणी तांदूळ लावल्याशिवाय पूर्ण मानली जात नाही.
ओवाळणीच्या ताटात दिवा देखील ठेवावा. यामुळे सर्वत्र सकारात्मक उर्जा प्रसारित होते.
ओवाळणीच्या ताटात मिठाई किंवा गोड पदार्थ देखील ठेवले पाहिजे.
राखी ओवाळणीच्या ताटात राखी, कलावा आणि नारळ ठेवणे देखील शुभ मानले जाते. कलावा पवित्रता आणि नारळ हे समृद्धीचे प्रतीक मानले जाते.