Manasvi Choudhary
साप हा असा प्राणी आहे, ज्याचे नाव ऐकताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. उन्हाळा आणि पावसाळा या दोन्ही ऋतूंमध्ये साप आपल्या बिळांमधून बाहेर पडतात, ज्यामुळे घराच्या आसपास किंवा बागेत त्यांची भीती वाढते.
उन्हाळ्यातच नाही तर पावसाळ्यात देखील साप बिळातून बाहेर निघतात त्यामुळे काळजी घेणे महत्वाचे आहे.
तुम्हाला माहितीये का? सापांना काही विशिष्ट गोष्टींचा वास अजिबात आवडत नाही. त्या वासानेच ते पळून जातात.
सांपाना पुदिन्यासा वास सहन होत नाही तुम्ही घरात किंवा बागेत पुदिना वनस्पती लावल्याने साप येणार नाही.
तुळसीचा वास सापांना आवडत नाही तुम्ही ज्या ठिकाणी साप येण्याची भिती आहे तेथे तुळशीचे रोप ठेवा.
साप धुराला घाबरतात. तुमच्या आसपास साप असल्याचा संशय असल्यास वाळलेली पाने जाळून धूर करा.
लिंबाचा रस, व्हिनेगर आणि दालचिनी तेल याचे थेंब मिक्स करून हे मिश्रण घराभोवती फवारल्यास साप येणार नाही.
येथे दिलेली माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.