Manasvi Choudhary
पावसाळ्यात हवेतील बदलामुळे आणि दमट वातावरणामुळे सर्दी-खोकल्याचा त्रास होणे सामान्य आहे. मात्र, काही सोप्या गोष्टींची काळजी घेतल्यास तुम्ही सर्दी- खोकल्याचा त्रासांपासून आराम मिळवू शकता.
पावसाळ्याच्या दिवसात बाहेरून आल्यानंतर किंवा जेवणापूर्वी साबणाने हात स्वच्छ धुवा.
पावसाळ्यात कोमट पाणी पिण्याची सवय लावा. थंड पाण्यामुळे घशाला सूज येणे किंवा सर्दी होऊ शकते. कोमट पाणी प्यायल्यामुळे घसा मोकळा होतो.
रोज ७ ते ८ तासांची पुरेशी झोप घ्या. झोपल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती चांगली राहते.
व्हिटॅमिन सी शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते. आवळा, संत्रे, लिंबू, पेरू, ही फळे रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.
आले हे सर्दी- खोकल्यावर प्रभावी आहे. दिवसातून एकदा आल्या काढा किंवा तुळशीचा चहा प्या यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
पावसाळ्यात भिजल्यानंतर ओले कपडे जास्त वेळ अंगावर ठेवल्यास सर्दी होण्याचा धोका वाढू शकतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.