Sakshi Sunil Jadhav
किडनी शरीरातला विषारी पदार्थ बाहेर टाकण्याचं महत्वाचं काम करते. पण आपल्या रोजच्या सवयींमुळे नकळक किडनी निकामी होऊ शकते.
किडनी खराब झाली की शराराचं संपूर्ण गणितच बदलतं.बऱ्याच गंभीर समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे वेळेआधीच तुमच्या सवयींमध्ये पुढील प्रमाणे बदल करा.
शरीरात पाण्याची कमतरता असल्यावर किडनीला विषारी पदार्थ फिल्टर करण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते. त्याने किडनी स्टोन आणि किडनीच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
जेवणात जास्त प्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढू शकतो. वाढलेला रक्तदाब किडनीवर ताण आणतो आणि ती हळहळू निकामी होते.
डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय काही पेनकिलर घेणं धोकाचं ठरू शकते. त्यामुळे किडनीच्या ऊतींना हानी पोहोचू शकते.
लघवी बराचवेळ थांबवून ठेवल्याने मूत्रमार्गावर दबाव वाढ जातो. त्यामुळे संसर्ग होण्याची आणि किडनीच्या समस्या निर्माण होण्याची शक्यताही वाढते.
रोज गोड पदार्थ खाल्याने डायबेटीज वाढते. डायबेटीज किडनीच्या आजारांचे एक प्रमुख कारण मानलं जातं.
बैठ्या जीवनशैलीमुळे लठ्ठपणा आणि हाय ब्लड प्रेशरचा धोका वाढला आहे. या दोन्ही गोष्टी किडनीच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.