Shreya Maskar
वसई-विरार परिसराजवळ चिंचोटी धबधबा आहे. पावसाळ्यात पर्यटक येथे आवर्जून जातात. या ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहणे आणि अचानक पूर येणे यामुळे येण्या-जाण्याचे मार्ग बंद होतात, ज्यामुळे हा भाग अत्यंत धोकादायक ठरतो.
पनवेल येथे कलावंतीण दुर्ग आहे. कलावंतीण दुर्गाला प्रबळगड असेही म्हणतात. पावसाळ्यात येथील खडकात कोरलेल्या अतिउतार असलेल्या पायऱ्या अत्यंत निसरड्या होतात.
खोपोली येथे झेनिथ धबधबा आहे. रायगड जिल्ह्यात स्थित असलेल्या या ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो आणि पर्यटक तिथे अडकू शकतात.
लोणावळ्यातील भुशी धरण हे अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ असले तरी तितकेच धोकादायक ठिकाण आहे. येथे अचानक पाणी ओसंडून वाहणे आणि पाण्याचे तीव्र प्रवाह यामुळे बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.
खारघर येथे पांडवकडा धबधबा आहे. नवी मुंबईतील हा धबधबा प्रचंड वेगाने आणि ताकदीने खाली कोसळतो. यामुळे अनेक जणांचा बळी गेला असून, स्थानिक प्रशासनाकडून येथे पर्यटकांच्या प्रवेशावर सहसा बंदी घातली जाते.
देवकुंड धबधबा रायगड जिल्ह्यात भिरा गावाजवळ आहे. हा धबधबा सुंदर जरी असला, परंतु मुसळधार पावसात येथील दरीतील पाण्याचे वेगवान आणि अनपेक्षित प्रवाह याला धोकादायक बनवतात.
पालघर येथे वांद्री तलाव धबधबा आहे. येथील गढूळ पुराचे पाणी काही मिनिटांतच वाढू शकते, पर्यटक अडकू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात येथे जाणे टाळा.
वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.