Maharashtra Tourism : पावसाळ्यात सुंदर दिसणारे पण धोकादायक आहेत 'हे' ५ पिकनिक स्पॉट्स, जाण्याआधी १०० वेळा विचार करा

Shreya Maskar

चिंचोटी धबधबा

वसई-विरार परिसराजवळ चिंचोटी धबधबा आहे. पावसाळ्यात पर्यटक येथे आवर्जून जातात. या ठिकाणी ओढे-नाले दुथडी भरून वाहणे आणि अचानक पूर येणे यामुळे येण्या-जाण्याचे मार्ग बंद होतात, ज्यामुळे हा भाग अत्यंत धोकादायक ठरतो.

Chinchoti Waterfall | pinterest

कलावंतीण दुर्ग

पनवेल येथे कलावंतीण दुर्ग आहे. कलावंतीण दुर्गाला प्रबळगड असेही म्हणतात. पावसाळ्यात येथील खडकात कोरलेल्या अतिउतार असलेल्या पायऱ्या अत्यंत निसरड्या होतात.

Kalavantin Durg | pinterest

झेनिथ धबधबा

खोपोली येथे झेनिथ धबधबा आहे. रायगड जिल्ह्यात स्थित असलेल्या या ठिकाणी मुसळधार पावसामुळे पाण्याचा प्रवाह अचानक वाढू शकतो आणि पर्यटक तिथे अडकू शकतात.

Zenith Waterfall | pinterest

भुशी धरण

लोणावळ्यातील भुशी धरण हे अत्यंत लोकप्रिय पर्यटन स्थळ असले तरी तितकेच धोकादायक ठिकाण आहे. येथे अचानक पाणी ओसंडून वाहणे आणि पाण्याचे तीव्र प्रवाह यामुळे बुडून मृत्यू झाल्याच्या अनेक दुर्दैवी घटना घडल्या आहेत.

Bhushi Dam | pinterest

पांडवकडा धबधबा

खारघर येथे पांडवकडा धबधबा आहे. नवी मुंबईतील हा धबधबा प्रचंड वेगाने आणि ताकदीने खाली कोसळतो. यामुळे अनेक जणांचा बळी गेला असून, स्थानिक प्रशासनाकडून येथे पर्यटकांच्या प्रवेशावर सहसा बंदी घातली जाते.

Pandavkada Waterfall | pinterest

देवकुंड धबधबा

देवकुंड धबधबा रायगड जिल्ह्यात भिरा गावाजवळ आहे. हा धबधबा सुंदर जरी असला, परंतु मुसळधार पावसात येथील दरीतील पाण्याचे वेगवान आणि अनपेक्षित प्रवाह याला धोकादायक बनवतात.

Devkund Waterfall | pinterest

वांद्री तलाव धबधबा

पालघर येथे वांद्री तलाव धबधबा आहे. येथील गढूळ पुराचे पाणी काही मिनिटांतच वाढू शकते, पर्यटक अडकू शकतात. त्यामुळे पावसाळ्यात येथे जाणे टाळा.

Vandri Lake Waterfall | pinterest

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Note | pinterest

NEXT : पावसाळ्यात ट्रेकचा अनुभव घ्यायचा? मग लोणावळ्याजवळील 'हा' किल्ला ठरेल बेस्ट

Pune Trekking | AI PHOTO
येथे क्लिक करा...