ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
वनडे सामन्यांनंतर, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात टी-20 मालिका खेळली जाणार आहे. 29 ऑक्टोबरपासून दोन्ही संघांमध्ये पाच टी-20 सामने खेळले जातील.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील टी-20 सामन्यांच्या इतिहासात, टीम इंडियाच्या फक्त एकाच खेळाडूने शतक झळकावले आहे.
या खेळाडूने भारताकडून शेवटचा सामना खेळल्यापासून एक वर्षपिक्षा जास्त काळ लोटला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी 20 मध्ये शतक करणारा ऋतुराज गायकवाड हा एकमेव फलंदाज आहे. त्याने 2023 मध्ये ही दमदार खेळी खेळली होती.
2023 मध्ये गुवाहाटी येथे खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात ऋतुराज गायकवाडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 57 बॉल्समध्ये नाबाद 123 धावा केल्या. त्याच्या खेळीत 13 चौकार आणि 7 षटकारांचा समावेश होता.
ऋतुराज गायकवाड सध्या भारताकडून कोणत्याही फॉरमॅटमध्ये खेळत नाहीये. त्याने आतापर्यंत टीम इंडियासाठी सहा वनडे आणि 23 टी-20 सामने खेळले आहेत.
तर तीन ऑस्ट्रेलियन फलंदाज शेन वॉटसन, ग्लेन मॅक्सवेल आणि जो इंग्लिस यांनी टी-20 मध्ये भारताविरुद्ध शतके झळकावली आहेत.