कोमल दामुद्रे
पहिल्यांदा प्रेम झाल्यानंतर नात्यात बऱ्याच गोष्टी बदलल्या जातात. तारुण्यात घडणाऱ्या या गोष्टींचा आपल्या नात्यावर परिणाम दिसून येतो.
नवनव जडलेलं हे प्रेम कधी काळी आपल्याला त्रासदायक वाटू लागतो. आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो ती व्यक्ती सतत आपल्या मित्रांसोबत गुरफटलेली असते.
ही गोष्ट समोरच्याला कळत जरी असली तरी आपण आपल्या नात्यात या गोष्टीमुळे दूरावा आणू नये. अशावेळी नेमके तुम्हाला काय वाटते हे सांगा.
जर त्या गोष्टीचा तुमच्या गर्लफ्रेंडला राग येत असेल तर त्याचा मध्यमार्ग काढा. यामुळे तुमच्या असणारे मतभेद कमी होतील.
आपल्या गर्लफ्रेंडलाच्या आवडीसाठी तिच्या मित्र-मैत्रिणींशी मैत्री करा ज्यामुळे तुमचे नाते अधिक घट्ट होण्यास मदत होईल.
आपल्या गर्लफ्रेंडच्या समोरच तिच्या मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवा अन्यथा, तुमच्यात पुन्हा गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे.
प्रत्येक वेळेस तिला टोमणे मारण्याचे बंद करा. अशामुळे तुमच्या नात्यात कटुता निर्माण होईल.