Sakshi Sunil Jadhav
कांदेपोहे हा महाराष्ट्रातील सर्वात आवडता नाश्ता आहे. सकाळी झटपट होणारा आणि हलका पदार्थ म्हणून तो सगळ्यांच्याच घरात आवडीने बनवला जातो. पण अनेकदा पोहे चिकट होतात, कधी कोरडे आणि वातड होतात, तर कधी चव हरवते.
पोहे बनवण्यासाठी मध्यम जाडीचे पोहे वापरा. खूप बारीक पोहे लवकर चिकटतात आणि जाड पोहे नीट मऊ होत नाहीत.
पोहे धुताना फक्त एकदा किंवा दोनदा पाण्याने स्वच्छ धुवा. सतत धुत राहिल्यास ते फुटतात आणि मऊ पडतात.
पोहे पाण्यात भिजवू नका. धुवून झाल्यावर गाळणीत ठेवून त्यांना फक्त ५-१० मिनिटं मऊ होऊ द्या. जास्त वेळ ठेवल्यास ते चिकट होतात.
कांदे हलक्या सोनेरी रंगावर परता. जास्त शिजवल्यास ते जळतात आणि पोह्यांचा स्वाद बदलतो.
जास्त तेल वापरल्यास पोहे ओले आणि जड होतात. तर कमी तेलामुळे ते कोरडे पडतात. एक मध्यम वाटी पोह्यांसाठी १.५ टेबलस्पून तेल पुरेसे आहे.
हळद, हिरवी मिरची आणि मीठ आधी कांद्यात मिसळा. नंतर पोहे टाका. यामुळे रंग आणि चव एकसमान पसरते.
पोहे परताना जोरात ढवळू नका. ते फुटू शकतात आणि चिकट होतात. हलक्या हाताने उलथून घ्या. शेवटी लिंबाचा रस आणि कोथिंबीर घाला.