ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लग्नसोहळा हा प्रत्येकाच्या आयुष्यातला आनंदाचा क्षण असतो.
यावेळी लग्नाचे सर्व विधी हे रिती-रिवाजानुसार पार पडले जातात.
साखरपुडा विधीत वर-वधू एकमेकांना अंगठी घालतात.
तेव्हा ते हाताच्या पंजाच्या चौथ्या बोटात म्हणजेच अनामिकामध्ये घालतात.
शास्त्रानुसार, लव्हर्स व्हेन नावाची एक रक्तवाहिनी माणसाच्या अनामिकेतून थेट हृदयात जाते. याचा अर्थ असा की या बोटाची तार थेट हृदयाशी जोडलेली आहे असा विश्वास आहे.
तसेच, डाव्या हाताच्या तिसऱ्या बोटाला वैवाहिक जीवनात महत्त्वाचे स्थान असते.
अनामिका जोडप्यामधील प्रेम दर्शवते. अनामिका हे दोन्ही जन्मापर्यंत एकत्र असण्याचे प्रतीक आहे, म्हणून या बोटात लग्नाची किंवा साखरपुड्याची अंगठी घातली जाते असेही म्हटंले जाते.