Manasvi Choudhary
मुसळधार पावसात मुंबईसह संपूर्ण राज्यात ठिकठिकाणी झाडे कोसळणाच्या घटना घडत आहेत. अनेक ठिकाणी झाडे कोसळून जिवितहानी, वित्तहानी देखील होते.
मात्र तुम्हाला माहितीये का? पावसाळ्यातच झाडे का कोसळतात? झाडे कोसळण्याची नेमकी कारणे काय आहेत.
पावसाळ्यात सततच्या पावसामुळे जमीन पूर्णपणे ओली होते. जमिनीतील मातीचा घट्टपणा कमी होऊन ती भुसभुशीत किंवा चिखलमय बनते. झाडाची मुळे मातीला घट्ट पकडून ठेवतात, पण जेव्हा माती खूप जास्त ओली होते, तेव्हा मुळांना पुरेसा आधार देऊ शकत नाही, ज्यामुळे झाड मुळासकट कोसळतात.
अनेकदा झाडांच्या मुळांना बुरशी किंवा इतर आजार झालेली असतात, जे वरून पटकन लक्षात येत नाहीत. पावसाळ्यात मुळांच्या सभोवताली पाणी साचून राहिल्याने मुळे कुजतात यामुळे झाड आतून कमकुवत होते आणि वाऱ्यानेही कोसळते.
पावसाळ्यापूर्वी झाडांच्या फांद्यांची योग्य छाटणी न केल्यास, झाडाचा वरचा भार वाढतो आणि झाड कोसळते.
काही झाडांची मुळे जमिनीच्या वरच्या थरातच पसरलेली असतात अशी झाडे पावसाळ्यात लवकर कोसळतात. तसेच, खूप जुनी झालेली झाडे ज्यांच्या खोडात पोकळी निर्माण झाली आहे, ती झाडेही पावसाळ्यात जोरदार वेगात कोसळतात.
पावसाळ्यासोबत वाऱ्याच्या वेगात मुळे जमिनीला घट्ट पकडू शकत नसल्यामुळे, वाऱ्याच्या दबावाखाली झाडे कोसळतात.