Sakshi Sunil Jadhav
सोशल मीडियावर रिलेशनशिप कंटेट तयार करणाऱ्या वनराज आणि श्री या कपलने लग्न तुटण्यामागची काही महत्त्वाची कारणं सांगितली आहेत.
करिअर करणारी पत्नी हवी, पण घरातील सर्व पारंपरिक जबाबदाऱ्याही तिच्याकडूनच अपेक्षित असणे नात्यात तणाव निर्माण करू शकते.
महिलेला आर्थिक आणि वैयक्तिक स्वातंत्र्य देण्याची भाषा केली जाते; मात्र तिच्या निर्णयांशी असहमती असल्यास तेच स्वातंत्र्य नाकारले जाते.
लग्नावर मोठा खर्च केला जातो, पण संवाद, समुपदेशन आणि वैवाहिक नाते मजबूत करण्यासाठी पुरेसा प्रयत्न केला जात नाही.
लग्नानंतर नवीन घर, कुटुंब आणि परंपरांशी जुळवून घेण्याची अपेक्षा अनेकदा फक्त महिलेकडून केली जाते.
घर आणि मुलांची जबाबदारी दोघांची असतानाही पुरुषाने घरकाम केले तर त्याला ‘मदत’ मानणे नात्यात नाराजी वाढवू शकते.
करिअर, माहेर आणि स्वतःच्या आयुष्यात मोठे बदल केल्यानंतरही त्याला सहज ‘समझोता’ म्हणून पाहिल्यास मनात नाराजी निर्माण होऊ शकते.
‘माझ्या आईला आवडत नाही’ किंवा ‘माझे घर काय म्हणेल?’ अशा सततच्या हस्तक्षेपामुळे पती-पत्नीमधील निर्णय घेण्याची मोकळीक कमी होऊ शकते.
लग्नानंतर समोरची व्यक्ती आपल्या अपेक्षेप्रमाणे बदलेल, या विचाराने केलेले लग्न भविष्यात निराशेचे कारण ठरू शकते.
पैशांचे नियोजन, मतभेद हाताळणे, भांडणानंतर संवाद साधणे आणि कुटुंबीयांसोबत सीमा ठरवणे याबाबतचा संवाद नसेल तर नात्यात दुरावा वाढू शकतो.