Surabhi Jayashree Jagdish
सध्या आशिया कप सुरु आहे आणि टीम इंडिया या स्पर्धेत चांगली कामगिरी करतेय.
वनडे आणि टी-२० फॉर्मेटमध्ये टीम इंडिया नेहमी निळी जर्सी घालून मैदानात उतरते.
काही काळाने टीम इंडियाच्या जर्सीचा लूक बदलला जातो.
मात्र तुम्ही कधी पाहिलंय का की, टीम इंडियाच्या जर्सीचा रंग कधीच बदलत नाही. याचं कारण तुम्हाला माहितीये का?
भारताच्या ध्वजामध्ये केशरी, पांढरा आणि हिरवा हे रंग आहेत, पण मध्यभागी अशोकचक्र गडद निळ्या रंगात आहे. त्या निळ्या रंगाचेच प्रतीक म्हणून भारतीय संघाची जर्सी निळ्या रंगाची ठरवली गेली.
प्रत्येक देशाला क्रिकेटमध्ये आपला वेगळा रंग देण्यात आलेला आहे. भारतासाठी अधिकृत रंग निळा (Blue) ठरवण्यात आला.
चाहत्यांनी आणि माध्यमांनी भारतीय संघाला "Men in Blue" अशी ओळख दिली.