Dhanshri Shintre
हातांवर मेहंदी काढण्याला खूप महत्त्व आहे.
मेहंदीला जवळपास सर्वच धर्मांत पवित्र मानलं जातं. लग्न समारंभात तर मेहंदीला विशेष महत्त्व असतं.
लग्नात वधू-वरांच्या हातात मेहंदी लावली जाते; पण लग्नात मेहंदी काढण्यामागचं कारण तुम्हाला माहीत आहे का?
हिंदू असो वा मुस्लिम, प्रत्येक जण मेहंदी वापरतो.
हिंदू धर्मात हा सोळा श्रृंगारांचा भाग मानला जातो.
खरं तर ही मेहंदी केवळ सौंदर्यातच भर घालत नाही, तर ती अतिशय पवित्रदेखील आहे.
असं म्हटलं जातं, की लग्नाच्या वेळी वधू-वरांना अस्वस्थ वाटू लागतं, ते घाबरतात.
अशा परिस्थितीत थंडावा देणारी मेहंदी लावल्यास शरीराचं तापमान कमी होतं.
याशिवाय मेहंदी हे प्रेमाचं प्रतीक मानलं जातं. मेहंदीचा रंग जितका लाल तितकं या जोडप्यामध्ये प्रेम वाढत जातं, असंही म्हणतात.
NEXT: लग्नाच्या वेळेस का केली जाते सप्तपदी? जाणून घ्या..