Surabhi Jayashree Jagdish
जगातील सात आश्चर्यांपैकी एक म्हणजे ताजमहाल. पण तुम्हाला माहितीये का की, ताजमहाल 50 विहिरींच्या वर बांधण्यात आला आहे.
यामागे एक वैज्ञानिक कारण आहे. ज्यामुळे शेकडो वर्षांनंतरही ताजमहाल इतका मजबूत उभा आहे.
या 50 विहिरींमध्ये ताजमहालचा पाया बांधण्यात आला आहे. ज्यावर संपूर्ण इमारतीचे वजन आहे.
यमुना नदीच्या पाण्यातून ओलावा मिळवणाऱ्या या विहिरींमध्ये आबनूस आणि महोगनी लाकूड टाकण्यात आले होते.
या लाकडांना जितका जास्त ओलावा मिळेल तितके ते मजबूत राहतील. यामुळेच यमुनेच्या काठावर ताजमहाल बांधला गेला.
पुरातत्वशास्त्रज्ञ डॉ.एन.के.भटनागर सांगतात की, ताजमहालच्या पायामध्ये असलेल्या विहिरींना सतत पाण्याची गरज असते.
आर्द्रतेमुळे यमुनेचं पाणी ताजमहालच्या पायापर्यंत पोहोचतं आणि त्यामुळे लाकूड सुरक्षित राहतं.
'या' फोटोमध्ये तुम्हाला जेलीफिश दिसतेय का? 9 सेकंदात शोधून दाखवा