साम टिव्ही ब्युरो
टाटा उद्योगसमूह हा बहुराष्ट्रीय कंपन्यांचा भारतीय उद्योगसमूह आहे.
टाटा हा भारतातल्या सर्वात मोठ्या खाजगी उद्योगसमूहांपैकी एक आहे.
रसायने, पोलाद, वाहननिर्मिती, माहिती तंत्रज्ञान, दूरसंपर्क, ऊर्जा, चहा या क्षेत्रांत या समूहातील कंपन्या प्रामुख्याने आघाडीवर आहेत.
टाटा समूहाची सुरुवात १८६८ मध्ये भारतात ब्रिटिश राजवट असताना जमशेटजी नसरवानजी टाटा यांनी हिंदुस्थानात कापसाचे व्यवहार करणाऱ्या कंपनीने स्थापना केली.
त्यानंतर नागपूरमध्ये १८७७ मध्ये एम्प्रेस मिल्सची स्थापना झाली.
१९०४ मध्ये जमशेटजींच्या मृत्यूनंतर त्यांचे पुत्र 'दोराबजी टाटा' समूहाचे चेअरमन झाले. त्यांच्या नेतृत्वाखाली समुहाने पोलादनिर्मिती आणि जल विद्युतनिर्मिती प्रकल्प सुरू केले.
सर दोराबजी टाटा यांच्या मृत्यूनंतर १९३४ मध्ये नवरोजी सकलातवाला यांनी पुढची सुमारे चार वर्षे समूहाची धुरा सांभाळली.
१९३८ मध्ये जहांगीर रतनजी दादाभाई अर्थात जे.आर.डी. टाटा हे या समूहाचे चेअरमन झाले.
टाटा केमिकल्स, टेल्को (आता टाटा मोटर्स), टाटा इंडस्ट्रीज, टाटा टी, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस आणि टायटन इंडस्ट्रीज ही रतनजी यांनी सुरू केलेल्या कंपन्यांची नावे आहेत.
रतन टाटा यांनी जेआरडींकडून १९९१ मध्ये सूत्रे स्वीकारली.
२०१६ मध्ये सायरस मिस्त्री टाटा समूहातून बाहेर पडले. २०१७ पासून नटराजन चंद्रशेखरन यांनी चेअरमनपदाची सूत्रे स्वीकारली आहेत.