Raksha Bandhan 2025: राख्यांचे खरे केंद्र कोणते? कालना, जयपूर की कोलकाता जाणून घ्या रंजक माहिती

Dhanshri Shintre

राख्यांचा बालेकिल्ला

रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात तयारी जोरात सुरू आहे, आणि एक ठिकाण आहे जे खास राख्या तयार करण्यासाठी प्रसिद्ध आहे राख्यांचा किल्ला.

राख्यांचा खरा गड

राखी म्हटलं की जयपूर आणि कोलकात्याचं नाव घेतलं जातं, पण प्रत्यक्ष राख्यांचा खरा गड काही वेगळंच ठिकाण मानलं जातं.

राख्यांचा किल्ला

पश्चिम बंगालमधील हुगळी नदीकिनारी वसलेले कालना शहर राख्यांचे उत्पादन केंद्र मानले जाते, त्यामुळेच ते ‘राख्यांचा किल्ला’ म्हणून प्रसिद्ध आहे.

किल्ला का बांधला गेला?

पश्चिम बंगालमधील कालना हे शहर राखी निर्मितीचे केंद्र असून येथे सर्वाधिक प्रकारच्या राख्या तयार केल्या जातात आणि मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते.

राख्यांचे प्रकार

कालना शहरात रेशीम, कापूस, मोती आणि धातूंपासून तयार केलेल्या पारंपरिक ते आधुनिक ट्रेंडच्या सर्व प्रकारच्या राख्या सहज उपलब्ध होतात.

दगडी राख्यांसाठी प्रसिद्ध

जयपूर शहर खास दगडी राख्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे तयार होणाऱ्या सुंदर राख्यांना देशभरातून मोठी मागणी आणि लोकप्रियता मिळते.

कोलकात्याची राखी

कोलकाता, पश्चिम बंगालची राजधानी, राख्यांच्या सुंदर डिझाइन्ससाठी प्रसिद्ध आहे. येथे अनेक प्रकारच्या आकर्षक आणि पारंपरिक राख्या सहज उपलब्ध होतात.

NEXT: आशियातील सर्वात मोठे गाव भारतात कोणत्या भागात आहे?

येथे क्लिक करा