Surabhi Jayashree Jagdish
नरक चतुर्दशीच्या दिवशी यमदेवतेची पूजा करून त्यांचा आशीर्वाद घेतला जातो. यामुळे घरात नकारात्मक शक्ती दूर होतात आणि शुभता निर्माण होते.
या दिवशी यमदीप लावणं ही एक प्राचीन आणि पवित्र परंपरा मानली जाते. असं मानलं जातं की, यमदीप लावल्याने अकाल मृत्यूचा भय दूर होतो. तसेच घरातील सदस्यांना आयुष्य, आरोग्य आणि शांतीचा आशीर्वाद मिळतो.
धार्मिक ग्रंथांनुसार, यमदीप प्रज्वलित केल्याने यमदेव प्रसन्न होतात. त्यामुळे घरातील लोकांना अकाली मृत्यू, अपघात किंवा अकल्पित संकटांपासून संरक्षण मिळतं.
ही पूजा करताना केवळ दीप लावणं पुरेसं नसतं. त्यासाठी शास्त्रात काही नियम सांगण्यात आलेत. हे नियम योग्य पद्धतीने पाळले, तर त्याचा लाभ अधिक प्रभावी मानला जातो. म्हणूनच प्रत्येकाने ही प्रक्रिया शिस्तबद्ध पद्धतीने करावी.
यमदीप लावण्याची वेळ आणि दिशा या दोन्ही गोष्टी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. दीप नेहमी संध्याकाळी किंवा रात्री दक्षिण दिशेला ठेवून प्रज्वलित करावा.
दीप लावण्यासाठी मातीपासून बनवलेला चौमुखा दिवा घेणं शुभ मानलं जातं. हा दिवा पवित्रतेचं प्रतीक असल्याने धार्मिक विधीत त्याला विशेष महत्त्व असतं.
दीप बाहेर ठेवल्यानंतर त्या ठिकाणी पुन्हा जाणं अशुभ मानले जातं. असे केल्यास विधीची शुद्धता भंग होते आणि श्रद्धेचा परिणाम कमी होतो असं मानलं जातं.