Manasvi Choudhary
एप्रिल- मे उन्हाळ्याचे दिवस सुरू झाले आहेत. संपूर्ण राज्याला उष्णतेने होरपळलं आहे. पुढील दोन दिवस उष्णतेची तीव्र लाट असणार आहे
कडाक्याच्या उन्हात शरीरातून जास्तीत घाम येतो यामुळे आरोग्याची काळजी घ्यावी लागते. यासाठी उन्हाळ्यात काय खावे आणि काय खाऊ नये हे जाणून घ्या.
उन्हाळ्यात उष्माघाताची समस्या उद्भवते. शरीरातील पाण्याची कमतरता असेल तर डिहायड्रेशनची समस्या उद्भवते.
उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही नियमितपणे फळांचा ज्यूस पिणे महत्वाचे आहे. संत्री, अननस, कलिंगड, द्राक्षे या फळांचा रस प्या.
कांदा, पुदिना, काकडी आणि गाजर सॅलड खा यामुळे शरीर थंड राहण्यास मदत होते.
दही, छास आणि लस्सी या थंड पदार्थाचे सेवन करा. संपूर्ण दिवसभरात जास्तीत जास्त पाण्याचे सेवन करा.
उन्हाळ्याच्या दिवसात लसणाचे सेवन करू नये. लसूण हे उष्ण असते यामुळे शरीराचे तापमान वाढू शकते.
उन्हाळ्यात मसालेदार पदार्थ खाणे टाळावे तसेच तळलेले तेलकट पदार्थ देखील खाऊ नका.
उन्हाळ्यात लोणचे, मासे, अंडी खाऊ नये.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.