Janmashtami Fast 2025: जन्माष्टमीचा उपवास मोडल्यास तुम्ही काय कराल? जाणून घ्या टिप्स

Dhanshri Shintre

श्रीकृष्णाच्या जन्माचा सण

जन्माष्टमी भगवान श्रीकृष्णाच्या जन्माचा सण आहे. भक्त उपवास करून आशीर्वाद मिळवतात, पण उपवास मोडल्यास काय करावे हे जाणून घेणे महत्वाचे आहे.

उपवास मोडू शकतो

उपासवाच्यात अन्न, पाणी किंवा नियमांचे उल्लंघन केल्यास उपवास मोडू शकतो. नकळत घडल्यास प्रायश्चित्त करून उपवासाची सुधारणा करता येते.

मनापासून क्षमा मागावी

उपासवाच्यादरम्यान उपवास मोडल्यास सर्वप्रथम मनापासून क्षमा मागावी. अजाणतेपणाने झालेल्या चुकीसाठी भगवान श्रीकृष्णाची प्रार्थना करून प्रायश्चित्त करावे.

मंत्राचा जप

"ॐ नमो भगवते वासुदेवाय" मंत्र १०८ वेळा जपल्यास मन शुद्ध होते आणि भक्तांना भगवान श्रीकृष्णाची कृपा मिळते.

धान्य दान करावे

चुकांचे प्रायश्चित्त करण्यासाठी दूध, दही, लोणी किंवा धान्य दान करावे. यामुळे जन्माष्टमीवरील भक्ती वाढते आणि आध्यात्मिक शांती अनुभवता येते.

शुद्ध पाण्याने स्नान

घरी शुद्ध पाण्याने स्नान करा आणि भगवान श्रीकृष्णाच्या मूर्तीवर पाणी किंवा दुधाचा अभिषेक करून सणाची भक्तिभावपूर्ण तयारी करा.

भगवद्गीतेतील श्लोक

भगवद्गीतेतील काही श्लोक, विशेषतः कर्मयोगाशी संबंधित वाचा. हे श्लोक मनाला शांती देतात आणि जीवनात योग्य मार्ग दाखवतात.

प्रार्थना करा

जवळच्या श्रीकृष्ण मंदिरात जाऊन दर्शन घ्या आणि प्रायश्चित्तार्थ प्रार्थना करा. भक्तीमुळे चुकांचे परिणाम कमी होतात आणि आध्यात्मिक शांती मिळते.

NEXT: जन्माष्टमीला काकडी देठासह कापली तर काय होईल?

येथे क्लिक करा