Ankush Dhavre
वानखेडच्या मैदानावर शुक्रवारी रोमांचक सामना पार पडला.
या सामन्यात मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.
या सामन्यात मुंबई इंडियन्स संघातील खेळाडूंनी जोरदार कामगिरी करत २७ धावांनी विजय मिळवला.
या सामन्याचा हिरो ठरला तो मिस्टर ३६० सूर्यकुमार यादव.
सूर्यकुमार यादवने ४९ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची खेळी केली.
या खेळीनंतर विराट कोहलीने इंस्टाग्राम स्टोरी शेअर करत त्याचं कौतुक केलं आहे.
विराटने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर सूर्याचा फोटो शेअर करत ' तुला मानलं भाऊ..' असे लिहिले आहे.
सूर्याच्या या खेळीचे अनेक दिग्गज खेळाडूंनी कौतुक केले आहे.
हे त्याच्या आयपीएल कारकिर्दीतील पहिलेच शतक आहे.