ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उद्धव ठाकरे यांनी आज भाषण करत इतिहासाची पुनरावृत्ती केली.
बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकदा टॅक्सीवर उभं राहून शिवसैनिकांशी संवाद साधला होता.
उद्धव ठाकरे यांनी देखील मातोश्रीबाहेर खुल्या कारमधून शिवसैनिकांशी संवाद साधला.
मशालही हे काढून घेतील, परंतु शिवसेना संपवता येणार नाही असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.
'मी कधी खचलो नव्हतो कधी कचणार नाही, असा ठाम निश्चय ठाकरे यांनी व्यक्त केला.
धनुष्यबाण घेऊन मैदानात या, मी मशाल घेऊन येतो असे आव्हान उद्धव ठाकरे यांनी शिंदे गटाला दिले आहे.
उद्धव ठाकरे भाषण करत असताना ठाकरे कुटुंब उपस्थित होते.
भाषण झाल्यावर उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे त्याच कारमधून बसून गेले.