Tulsi Vivah: दिवाळीनंतर तुळशीचं लग्न कोणासोबत लावतात? कोण आहे तुळशीचा नवरा

Surabhi Jayashree Jagdish

तुळशी देवी कोण होती?

तुळशी देवीचा जन्म धर्मात्मा असुर राजा जालंधराची पत्नी वृंदा म्हणून झाला होता. ती अत्यंत पवित्र आणि भगवान विष्णूची मोठी भक्त होती. तिच्या पतिव्रतेच्या शक्तीमुळेच जालंधराला कोणीही युद्धात पराभूत करू शकत नव्हतं.

जालंधराचा अहंकार आणि देवांशी युद्ध

जालंधर आपल्या सामर्थ्यामुळे गर्विष्ठ झाला आणि देवांवर आक्रमण करू लागला. त्याला कोणीही हरवू शकत नव्हतं, कारण त्याच्या पत्नी वृंदेच्या पतिव्रतेचं तेज त्याचं संरक्षण करत होतं. त्यामुळे देवांनी भगवान विष्णूंकडे मदत मागितली.

भगवान विष्णूंची युक्ती

जालंधराला हरवण्यासाठी भगवान विष्णूंनी जालंधराचं रूप धारण केलं आणि वृंदेच्या समोर आले. वृंदेला वाटलं की तिचा पती परत आला आहे, पण विष्णूंच्या स्पर्शाने तिचं पतिव्रत्य भंगलं आणि त्याच क्षणी जालंधर युद्धात मरण पावला.

वृंदेचा शाप

वृंदेला जेव्हा सत्य कळलं, तेव्हा ती संतापली आणि भगवान विष्णूंना शाप दिला की, “तुम्ही माझं पतिव्रत्य तोडलंत, म्हणून तुम्ही दगडात रुपांतरित व्हाल.” हा शापच पुढे शाळिग्राम रूपात विष्णूंना मिळाला.

वृंदेचं तुळशीमध्ये रूपांतर

वृंदा दुःखाने अग्निप्रवेश करत असताना तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन भगवान विष्णूंनी तिला तुळशीच्या स्वरूपात पुनर्जन्म दिला. त्यांनी वचन दिलं की, पुढे तिचं त्यांच्याशी पुनर्मिलन तुळशी विवाहाद्वारे होईल.

तुळशीचा नवरा कोण?

म्हणूनच तुळशी देवीचा विवाह शाळिग्राम (भगवान विष्णूचं रूप) यांच्याशी केला जातो. हा विवाह म्हणजेच तुळशीचं परमेश्वराशी पुनर्मिलन असतं.

तुळशी विवाहाचं धार्मिक महत्त्व

तुळशी विवाहानंतर मनुष्यांच्या विवाह सोहळ्यांची सुरुवात होते. तुळशीचं लग्न केल्याने घरात सौख्य, समृद्धी आणि वैवाहिक सुख वाढतं असं मानलं जातं.

सर्वाधिक शिकलेला मुघल बादशाह कोण होता?

Mughal emperor | saam tv
येथे क्लिक करा