Sakshi Sunil Jadhav
तुळस ही प्रत्येक घरात किंवा घराच्या अंगणात आपल्याला पाहायला मिळते. ही अत्यंत महत्वाची असते. धार्मिक कार्यात तुळशीचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो.
हिंदू धर्मात असं म्हणतात की, तुळस वारंवार सुकत असेल तर लक्ष्मी तुमच्यावर नाराज असल्याचे संकेत असू शकतात.
कारण तुळस ही एक लक्ष्मीचे रुप आणि विष्णुंची प्रिय मानली जाते. त्यामुळे पुजेसाठी तिचा वापर केला जातो.
तुळस सुकली की वास्तु शास्त्रानुसार काही उपाय करणं फायद्याचं ठरु शकतं. त्यामुळे ती सुकली की फेकून देणं टाळा.
जेव्हा तुळस सुकते तेव्हा त्याच्या दांड्या घासून त्याचा वापर चंदनाऐवजी टिळ्यासाठी करु शकता. याने मनात भक्ती आणि एकाग्रता वाढू शकते.
जर तुळस खूपच सुकली असेल तर ते रोप पवित्र नदीत, किंवा समुद्रात विसर्जित करावी.
सुकलेल्या तुळशीपासून तुम्ही तिचा हार बनवू शकता. त्याने भगवान विष्णून आणि कृष्ण भगवान प्रसन्न होतील.
जर तुळस जास्त सुकली नसेल तर तीला पाणी घालून जगवण्याचा प्रयत्न करा. तसेच दिवा नियमित दिवा लावा.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.