Manasvi Choudhary
पावसाळा म्हटलं की सर्वातआधी आठवतो तो म्हणजे टपरीवरचा गरमा गरम चहा आणि भजी.
टपरीवरच्या चहाची चव एवढी अप्रतिम आणि कडक असते की, तो एक कप चहा प्यायल्यानंतर शरीरातील सगळा थकवा पळून जातो आणि एक वेगळीच ऊर्जा मिळते.
मात्र, अनेक महिलांची ही तक्रार असते की आम्ही घरी कितीही प्रयत्न केला, तरी टपरीसारखा चहा घरी बनतच नाही. यासाठी आज आम्ही तुम्हाला एक सोपी ट्रिक सांगणार आहोत.
तुम्हालाही टपरीसारखी चहा घरी बनवायचा असेल तर सुठं, काळी मिरी, लवंग, हिरवी वेलची, दालचिनी, बडीशेप, जायफळ याची बारीक पावडर एका डब्यामध्ये बनवून ठेवा.
चहा बनवताना त्यात तुम्ही ही कोरड्या मसाल्यांची पावडर मिक्स करा. चहाची चव वाढवण्यासाठी तुम्ही त्यात वेलची, लवंग, मिरी, दालचिनी आणि बडीशेप टाका.
चहामध्ये दूध घातल्यानंतर तो लगेच गॅसवरून उतरवू नका. चहाला चांगले उकळू द्या चहा जितका चांगला उकळेल, तितका मसाल्यांचा अर्क चहामध्ये उतरेल आणि चहाला टपरीसारखा सुंगध आणि चव येईल.