Dhanshri Shintre
भारतात अनेक आकर्षक रेल्वे स्थानके आहेत, ज्यांचे सौंदर्य पाहून पर्यटक थक्क होतात. चला जाणून घेऊया ही खास रेल्वे स्थानके.
दक्षिण गोव्याजवळील दूधसागर गावाजवळ रेल्वे स्टेशनवरून जाणाऱ्या गाड्यांमधून दुधासारखा भासत असलेला सुंदर धबधबा दिसतो.
चेन्नईचे मध्य रेल्वे स्थानक, जे ‘दक्षिण द्वार’ म्हणून प्रसिद्ध आहे, तब्बल १४३ वर्षांची ऐतिहासिक ओळख जपून आजही आकर्षक भासते.
केरळमधील तिरुवनंतपुरम रेल्वे स्थानक हे राज्यातील सर्वात मोठे असून, भारतातील अतिवर्दळीच्या प्रमुख रेल्वे स्थानकांपैकी एक मानले जाते.
लखनऊचे चारबाग रेल्वे स्टेशन आपल्या आकर्षक रचनेसाठी प्रसिद्ध असून, मोठा आणि लहान असे दोन मार्ग असलेले हे स्टेशन सदैव वर्दळीचे असते.
कन्नूर रेल्वे स्टेशन आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध असून, हे शहराला थेट जोडते आणि इथून निलगिरी पर्वतरांगांचे मनमोहक दृश्य दिसते.
घुम रेल्वे स्टेशन जगातील सर्वात उंच स्थानक मानले जाते. इथून धावणारी टॉय ट्रेन पर्यटकांना ऐतिहासिक आणि पौराणिक कथा अनुभवायला देते.
कानपूरचे मध्यवर्ती रेल्वे स्टेशन मोठे आणि गजबजलेले असून, त्याची रचना आणि गर्दी लखनऊच्या चारबाग स्टेशनशी साधर्म्य दाखवते.
कटक रेल्वे स्टेशनची रचना राजवाड्यासारखी भव्य आहे, तसेच ते ऐतिहासिक बाराबाटी किल्ल्याच्या शैलीत बांधलेले असल्यामुळे ते खास दिसते.
बनारस रेल्वे स्टेशन आपल्या सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे, जिथे भगवान शिवाच्या मूर्ती आणि वाहणाऱ्या गंगेचे सुंदर दृश्य पाहायला मिळते.