Surabhi Jayashree Jagdish
असंतुलित आहार, जास्त तळलेलं आणि फास्ट फूड खाल्ल्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. शारीरिक हालचाली कमी असणे हेही मोठं कारण आहे.
जास्त कोलेस्ट्रॉलमुळे नसांमध्ये ब्लॉकेज तयार होऊ शकतो. त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचा धोका वाढतो. मेंदू आणि इतर अवयवांपर्यंत रक्तपुरवठा कमी होऊ शकतो.
ही स्थिती वाढल्यास पायांमध्ये गंभीर ब्लॉकेज निर्माण होऊ शकते. काही वेळा गॅंग्रीनसारखी गंभीर अवस्था निर्माण होऊ शकते. वेळेत उपचार न घेतल्यास शस्त्रक्रियेची गरज भासू शकते.
चालताना किंवा थोडे अंतर गेल्यावर पायात तीव्र वेदना सुरू होतात. या वेदना विश्रांती घेतल्यावर कमी होत नाहीत. हे नसांमध्ये रक्तपुरवठा कमी झाल्याचं महत्त्वाचं लक्षण आहे.
न चालताही पाय नेहमी जड आणि थकलेले वाटतात तर सावध व्हा. स्नायूंना पुरेसा ऑक्सिजन न मिळाल्यामुळे ही अवस्था होते. दीर्घकाळ उभं राहिल्यास हा त्रास अधिक वाढतो.
एका किंवा दोन्ही पायांमध्ये शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत थंडपणा जाणवतो. रक्तप्रवाह कमी झाल्यामुळे ही स्थिती निर्माण होते. अनेकदा पाय सतत गार वाटतात आणि अस्वस्थता वाढते.
पायावर छोटी जखम झाली तरी ती बरी होण्यासाठी खूप वेळ लागतो. कारण त्या भागात रक्तपुरवठा आणि ऑक्सिजन कमी मिळतो. कधी कधी जखम वाढून संसर्ग होण्याचा धोका निर्माण होतो.