Dhanshri Shintre
मुंबई ते राजगड हे अंतर साधारणतः 210 ते 230 किलोमीटर आहे आणि प्रवासाला 6 ते 7 तास लागू शकतात, वाहतुकीवर अवलंबून आहे.
मुंबईहून राजगड किल्ल्यावर जाण्यासाठी, मुंबई-पुणे द्रुतगती मार्ग आणि पुणे-सासवड-वेल्हे मार्ग हा सर्वोत्तम पर्याय आहे.
राजगडला पोहोचण्यासाठी गुगल मॅप वापरणे सोपे आणि उपयुक्त ठरेल.
मुंबईहून पुण्याला ट्रेन किंवा बसने जाऊ शकतात.
पुण्याहून वेल्हेसाठी एसटी किंवा खासगी वाहन घ्या, वेल्हे ते पाली गावापर्यंत टॅक्सीने जा.
राजगडाच्या ट्रेकची सुरुवात पाली गाव येथून होते. येथून राजगडाची चढाई साधारणतः 2.5 ते 3 तासांची असते.
राजगड ट्रेक पावसाळ्यात सुंदर वाटतो पण निसरडे रस्ते आणि दाट धुके असल्याने सावधगिरी अत्यंत आवश्यक आहे.
राजगड किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांचे पहिले राजधानीचे ठिकाण होते. सुंदर बालेकिल्ला, पद्मावती माची, संजीवनी माची इत्यादी पहाण्यासारखे ठिकाणे आहेत.
ऑक्टोबर ते फेब्रुवारी हा ट्रेकसाठी सर्वोत्तम काळ आहे. उन्हाळ्यात थोडेसे गरम, पावसाळ्यात चढाई थोडी कठीण होते.