Sakshi Sunil Jadhav
दिवसातून 2 ते 3 कप चहा पुरेसा आहे. त्यापेक्षा जास्त चहा प्यायल्यास शरीरात कॅफिनचे प्रमाण वाढून हृदयाची गती, तणाव आणि अॅसिडिटी वाढू शकते.
सकाळी उठताच चहा किंवा कॉफी पिण्याची सवय टाळावी. रिकाम्या पोटी चहा घेतल्यास अॅसिडिटी, अपचन आणि ताण वाढू शकतो.
चहाऐवजी ताजी फळे खाल्ल्यास पचन सुधारते, रक्तदाब नियंत्रणात राहतो आणि दिवसभर ऊर्जा टिकते.
सायंकाळी किंवा रात्री उशिरा चहा घेतल्यावर झोपेवर परिणाम होतो. निद्रानाश, चिडचिड आणि अस्वस्थता वाढते.
जेवणाच्या वेळी किंवा लगेच नंतर चहा घेतल्यावर पचनावर परिणाम होतो. गॅस, पोट फुगतं आणि अपचनाची समस्या वाढू शकते.
संशोधनानुसार आठवड्यातून तीन वेळा साखरेशिवाय चहा घेतल्याने हार्ट अटॅकचा धोका 20% कमी होऊ शकतो.
बिस्किटे, फरसाण, तळलेले स्नॅक्स टाळा. त्याऐवजी भाजलेले मखाणे, काळे हरभरे, मिश्र बिया यांसारखे पौष्टिक पर्याय निवडा.
जास्त साखरयुक्त चहा घेतल्यास रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. त्यामुळे मधुमेहाचा धोका वाढतो. वेळेवर घेतलेला चहा आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतो.