Satish Kengar
राहिले रे अजून श्वास किती?
जीवना, ही तुझी मिजास किती?
कोण जाणे कोण हे जवळून गेले?
चांदणे रक्तामध्ये मिसळून गेले!
इतकेच मला जातांना सरणावर कळले होते
मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते
‘जगत मी आलो असा की मी जसा जगलोच नाही
एकदा तुटलो असा की मग पुन्हा जुळलोच नाही..’
‘‘मी बोललो जरा अन् जो तो मला म्हणाला
‘माझीच ही कहाणी! माझीच ही कहाणी’!’’
रंगुनी रंगांत साऱ्या रंग माझा वेगळा!
गुंतुनी गुंत्यात साऱ्या पाय माझा मोकळा!
येथे कुणीच नाही माझ्यापरी दिवाणे
गीत गात आहे येथे गुन्ह्याप्रमाणे
कळे न काय कळे एवढे कळून मला
जगून मीच असा घेतसे छळून मला