Shruti Vilas Kadam
उन्हाळ्यात जास्त घाम येतो, त्यामुळे शरीरातील पाणी कमी होते. यासाठी भरपूर पाणी, नारळपाणी आणि लिंबूपाणी पिणे आवश्यक आहे.
अतिउष्णतेमुळे चक्कर, उलटी, डोकेदुखी होऊ शकते. दुपारच्या वेळेत बाहेर जाणे टाळावे आणि डोक्यावर टोपी किंवा कॅप वापरावी.
जास्त उन्हात राहिल्याने त्वचा जळते आणि काळी पडते. बाहेर जाताना सनस्क्रीन, सनग्लासेस आणि पूर्ण बाह्यांचे कपडे वापरावेत.
उष्णतेमुळे शरीर लवकर थकते. हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा, तसेच पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे.
कडक उन्हामुळे डोळ्यांना जळजळ किंवा कोरडेपणा जाणवतो. सनग्लासेस वापरणे आणि डोळ्यांना थंड पाण्याने धुणे फायदेशीर ठरते.
उन्हाळ्यात अन्न पटकन खराब होते, ज्यामुळे फूड पॉइझनिंगचा धोका वाढतो. ताजे आणि स्वच्छ अन्नच खावे.
हलके, सैल कपडे घालावेत, भरपूर पाणी प्यावे, घराबाहेर पडताना छत्री किंवा टोपी वापरावी आणि शक्यतो दुपारच्या उन्हात बाहेर जाणे टाळावे.