Sakshi Sunil Jadhav
उन्हाळा वाढला की, जास्त तिखट पदार्थ पचत नाहीत. पचनाच्या अनेक समस्या झपाट्याने वाढतात.
तुम्ही अशावेळेस तुमच्या आहारात काही महत्वाच्या पदार्थांचा समावेश केलात तर तुम्हाला पित्त, उष्णता आणि पोट साफ न होण्याच्या समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
सब्जाच्या बिया पाण्यात भिजवून रोज पित राहा. त्याने शरीर थंड राहतं, पित्त कमी होतं आणि पचन सुधारतं.
नारळपाणी प्यायल्याने शरीर थंड होतं. मग डिहायड्रेशनचा त्रास कमी होतो. तसेच पोट हलकं होतं.
छास किंवा ताकाचे सेवन केल्याने पचन सुधारतं, आम्लपित्ताचा त्रास कमी होतो. याने शरीरातली उष्णता कमी होते.
काकडीत पाण्याचं प्रमाण जास्त असतं. त्याने शरीर थंड राहतं आणि पोट साफ व्हायला मदत होते.
कलिंगड हे शरीराला हायड्रेट ठेवून उष्णता कमी करतं आणि पचन सुधारतं.
लिंबूपाण्याने शरीरातले टॉक्सिन्स बाहेर होतात आणि पित्त कमी होतं.
दही गट हेल्थ सुधारतं आणि पचनक्रिया सुरळीत ठेवतं. तसेच पुदिन्याचे पाणी हे पोटात थंडावा निर्माण करतं पोटदुखी आणि गॅस कमी करतं.