Manasvi Choudhary
आज गणेश चतुर्थीनिमित्त ढोल- ताशाच्या गजरात घरोघरी गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे.
गणपती बाप्पाच्या आगमनाने वातावरण मंगलमय झाले आहे.
गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्थीपर्यंत मोठा आनंदोत्सव साजरा केला जाणार आहे.
गणपती बाप्पा भक्तांच्या आयुष्यातील विघ्न, संकट दूर करतो यासाठी श्रीगणेशाचे पूजन केले जाते.
आरती, भजन- किर्तन सुरू असल्यास टाळ्या वाजवल्या जातात यामागे धार्मिक कारण आहे.
टाळी वाजवण्याची प्रथा जुनी आहे भक्त प्रल्हादने टाळी वाजवण्याची सुरूवात केली
भक्त प्रल्हादाच्या वडिलांना विष्णू भक्ती आवडत नव्हती. यासाठी त्यांनी अनेक उपाय केले पण ते झाले नाही.
अखेर प्रल्हादाने भगवंताचे स्मरण करताना टाळ्या वाजवल्या आणि तेव्हापासून टाळ्या वाजवण्याची परंपरा सुरू झाली आहे.
टाळी वाजवल्याने नकारात्मक उर्जा दूर होऊन व मन प्रसन्न होते.
टाळ्या वाजवल्याने उच्च रक्तदाब, डिप्रेशन, डोकेदुखी यासारंख्या आजारांना आराम मिळतो.