Sakshi Sunil Jadhav
सगळ्यांनाच फीट राहायला आवडतं. पण कामाच्या वेळेमुळे अनेकांना जीमला जाता येत नाही. त्यामुळे ते हेल्दी राहण्यासाठी चालणे हा पर्याय निवडतात.
तज्ज्ञांच्या मते फक्त चालणं पुरेसं नाही तर त्यामध्ये चालण्याचील योग्य पद्धत रक्ताभिसरण सुधारण्यासाठी जास्त महत्त्वाची असते.
फक्त चालणं पुरेसं नाही योग्य वेग आणि योग्य पद्धतीने चालणं महत्वाचं असतं. चालताना श्वास थोडा वाढेल इतक्या वेगाने चालणं कधीही फायद्याचं ठरु शकतं.
कॅल्फ मसल्स अॅक्टिव्ह ठेवा. कारण पायांच्या स्नायूंना काम मिळालं तर रक्त वर ढकलण्यास मदत होते.
100 ते 120 पावलं प्रत्येक मिनिट हा वेग नसांच्या आरोग्यासाठी योग्य मानला जातो.
20 ते 30 मिनिटं रोजच्या रोज चालणं फायद्याचं असतं. सतत चालत राहील्यामुळे नसांवर दबाव कमी होतो.
स्नायू आकुंचन-प्रसरणामुळे रक्तप्रवाह सुधारतो. त्यामुळे मसल कॉन्ट्रॅक्शन महत्त्वाचं असतं.
चालल्यामुळे पायात रक्त साठण्याचा धोका कमी होतो. तसेच योग्य चालण्यामुळे रक्ताच्या गाठी होण्याचा धोका कमी होतो.
हळू चालणं न चालण्यापेक्षा चांगलं आहे. पण जर तुम्ही रक्ताभिसरण सुधारण्यासाठी चालत असाल, तर वेग आणि पद्धत याकडे जास्त लक्ष द्या.