ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
श्रावण महिना म्हटलं की मांसाहार खावे की नाही असा प्रश्न अनेकांना असतो.
श्रावण महिना हा आराधना- उपासना करण्याचा महिना मानला जातो.
हिंदू धर्मानुसार, श्रावण महिन्यातील प्रत्येक दिवस हा देवाला समर्पित आहे आणि फारपूर्वीपासून भक्तामध्ये त्याचे विशेष महत्व आहे.
आयुर्वेदानुसार, श्रावण हा असा महिना आहे ज्यामध्ये आपली प्रतिकारशक्ती सर्वात खालच्या पातळीवर येते
या महिन्यात मांसाहारी, मसालेदार किंवा तेलकट पदार्थ खाल्ल्याने रोगप्रतिकारक शक्ती तसेच पचनसंस्थेवर परिणाम होतो कारण ते पचायला जड असतात
श्रावण महिना हा सर्व प्राण्यांचा प्रजनन काळ मानला जातो यामुळे मासांहार खाणे टाळले जाते.