Manasvi Choudhary
भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचा सण म्हणजेच रक्षाबंधन. या दिवशी बहीण आपल्या लाडक्या भावा राखी बांधते.
मात्र, बऱ्याच जणांच्या मनात हा प्रश्न नेहमीच असतो की, भावाला राखी बांधताना नेमक्या किती गाठी बांधाव्यात? ३ की ५?
राखीची पहिली गाठ ब्रम्हदेवाशी संबंधित असून जीवनाची नवी सुरुवात व प्रगतीचे प्रतीक आहे.
राखीची दुसरी गाठ भगवान विष्णूशी संबंधित असून आयुष्यात सुख, शांती आणि स्थिरता टिकवून ठेवण्यासाठी बांधली जाते.
राखीची तिसरी गाठ भगवान शिवाला समर्पित असून भावाच्या आयुष्यातील सर्व नकारात्मक ऊर्जा आणि वाईट शक्ती दूर करण्यास मदत करते.
काही घरांमध्ये किंवा विशिष्ट परंपरेनुसार राखीला ५ गाठी बांधल्या जातात. या ५ गाठी पंचमहाभूतांचे म्हणजेच पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश याचे प्रतीक मानले जातात.
निसर्गाच्या या पाच तत्त्वांप्रमाणेच भावाचे आयुष्य निरोगी, सुरक्षित आणि ऊर्जेने असावे असा त्यामागचा अर्थ होतो.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.