Rajgad Fort History: छत्रपती शिवाजी महाराजांची पहिली राजधानी, राजगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

Dhanshri Shintre

राजधानीचा किल्ला

राजगड हा छत्रपती शिवाजी महाराजांचा पहिला राजधानीचा किल्ला होता आणि जवळपास २५ वर्षे तो राजधानी म्हणून वापरला गेला.

प्राचीन नाव

या किल्ल्याला पूर्वी मुरुंबदेव किल्ला म्हणून ओळखले जात असे, नंतर महाराजांनी त्याचे नाव बदलून राजगड ठेवले.

उंची आणि रचना

किल्ला समुद्रसपाटीपासून सुमारे १,३७६ मीटर उंच आहे आणि त्याची रचना त्रिकोणी स्वरूपात आहे.

तीन प्रमुख माची

राजगडावर सुवेळा माची, संजीवनी माची आणि पद्मावती माची या तीन महत्त्वाच्या माची आहेत.

पद्मावती माचीचे महत्त्व

इथे महाराजांचा दरबार, निवासस्थान आणि इतर महत्त्वाच्या इमारती होत्या.

संजीवनी माची

युद्धनितीच्या दृष्टीने मजबूत रचना असलेली ही माची संरक्षणासाठी महत्त्वाची होती.

सुवेळा माची

ही माची शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी उपयुक्त होती.

बालेकिल्ला

राजगडाच्या शिखरावर असलेला बालेकिल्ला रणनीती आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचा असून तिथून आजूबाजूचे किल्ले स्पष्ट दिसतात.

ऐतिहासिक प्रसंग

याच किल्ल्यावर महाराजांच्या पत्नी सईबाईंचे निधन झाले, तसेच अनेक महत्त्वपूर्ण राजकीय व लष्करी निर्णय इथे घेतले गेले.

NEXT: ट्रेकिंगसाठी लोकप्रिय! महाराष्ट्रातील प्राचीन असा लोहगड किल्ल्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

येथे क्लिक करा