Shreya Maskar
सागरगड किल्ला हा रायगड जिल्ह्यातील अलिबागपासून सुमारे १८ किलोमीटर अंतरावर आणि समुद्रसपाटीपासून १,३५७ फूट उंचीवर वसलेला आहे.
सागरगड किल्ल्याचा ट्रेक खांदाळे गावातून सुरू होते आणि धोंडाणे धबधबा , सिद्धेश्वर मंदिरावरून पुढे जाते. या वाटेवर हिरवीगार वनराई, ऐतिहासिक अवशेष आणि अरबी समुद्राचे विहंगम दृश्य अनुभवता येते.
छत्रपती शिवाजी महाराजांनी १६६० मध्ये आदिलशाही राजवटीकडून सागरगड किल्ला जिंकून घेतला होता. पुढे, १६६५ च्या पुरंदरच्या तहाअंतर्गत मुघलांना सोपवण्यात आलेल्या २३ किल्ल्यांपैकी हा एक किल्ला होता; मात्र आग्र्याहून सुटका झाल्यानंतर शिवाजी महाराजांनी तो पुन्हा आपल्या ताब्यात घेतला.
वरच्या बाजूने किंवा आकाशातून पाहिल्यास, सागरगड किल्ल्याचा आकार वैशिष्ट्यपूर्ण 'Y' (वाय) अक्षरासारखा दिसतो. किल्ल्याच्या माथ्यावरील रचनेचे दोन स्वतंत्र डोंगररांगांमध्ये विभाजन होते. त्यापैकी एक प्रमुख शाखा 'वानरटोक' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या, अंगठ्यासारख्या उंच शिखराकडे जाते.
सागरगड किल्ल्याचे काही भाग प्राचीन सातवाहन राजवटीच्या काळातील, तसेच नंतरच्या निजामशाही आणि आदिलशाही काळातील आहेत.
सागरगड किल्ला किनारपट्टीवरील मार्ग आणि धरमतर खाडीवर लक्ष ठेवण्यासाठी बांधलेला होता. प्राचीन मंदिरे, पाण्याच्या टाक्या, खडकात कोरलेल्या गुहा येथे आहे. तसेच अरबी समुद्राचे विहंगम दृश्य पाहायला मिळते.
सागरगड किल्ल्याजवळ धोंडाणे धबधबा आहे. पावसाळ्यात या धबधब्याचे सौंदर्य स्वर्गाहून सुंदर होते. किल्ल्याच्या वरच्या भागात प्राचीन गुहा आहे.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.