Siddhi Hande
जेवणानंतर शतपावली करावी, असे फार पूर्वीपासून सांगतात. शतपावली केल्यावर तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होतो.
रोज जेवल्यावर कमीत कमी १० मिनिटे चालणे गरजेचे आहे.
जेवल्यानंतर चालल्यावर तुमच्या शरीरातील साखरेची पातळी ३० टक्क्यांनी मी होते. त्यामुळे रक्तप्रवाहात ग्लुकोज कमी वेगात प्रवेश करते.
जेवल्यानंतर चालल्याने स्नायूंना रक्तातून ग्लूकोज काढून टाकण्यास मदत करते. यामुळे शरीराला फायदे होतात.
जेवल्यानंतर चालल्याने पचनक्रिया चांगले होते. यामुळे कफचा त्रास होत नाही.
जेवल्यानंतर चालल्याने गॅसचा त्रास होत नाही. तुमच्या शरीरातील अन्न पचण्यास मदत होते.
जेवल्यानंतर हळूहळू चालल्याने पचनक्रिया होते. यामुळे शरीरातील आम्लाचा संपर्क कमी होतो. यामुळे छातीत जळजळ होत नाही.
जेवल्यानंतर रक्तप्रवाहातील चरबी कमी होण्यास मदत होते. यामुळे फॅटी लिव्हर, जळजळ कमी होते.
जेवल्यानंतर चालल्यावर शरीराची हालचाल होते. त्यामुळे चांगली झोप लागते. जेवल्यानंतर नेहमी हळूहळू चालावे. १०-१२ मिनिटे चालणे गरजेचे आहे.
वरील माहिती सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी डॉक्टरांशी संपर्क साधा.