Vishal Gangurde
काल भारताच्या अध्यक्षतेखाली जी२०चा शुभारंभ झाला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी-२० च्या शिखर परिषदेत सदस्य आणि पाहुणे म्हणून आलेल्या नेत्यांना संबोधित केलं.
जी-२० परिषदेत पंतप्रधान मोदींच्या टेबलावर ठेवण्यात आलेल्या लाकडी फलक चर्चेचा विषय ठरला आहे.
या फलकावर 'इंडिया'ऐवजी 'भारत' नाव लिहिण्यात आल्याचं समोर आलं आहे.
राष्ट्रपतींकडून जेवणाच्या कार्यक्रमासाठी देण्यात आलेलं निमंत्रण 'द प्रसिडेंट ऑफ भारत' या नावानं देण्यात आलं आहे.
देशात नावाच्या वादावरून राजकारण तापलं आहे.
देशातील विरोधी पक्षांनी यावरून मोदी सरकार निशाणा साधला आहे.
नरेंद्र मोदींच्या फोटोमुळे केंद्र सरकार 'इंडिया' हे नाव बदलून 'भारत' करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.