Sandeep Gawade
आसामच्या जतिंगामध्ये मोठ्या प्रमाणात भूस्खलन झाल्यामुळे त्रिपुराकडे येणाऱ्या मालगाड्या थांबवण्यात आली आहे. त्यामुळे पेट्रोल-डिझेलचा तुटवडा निर्माण झाला आहे.
इंधनाचा तुटवटा जाणवल्यामुळे त्रिपुरा सरकारने बुधवारी पट्रोल डिझेल विक्रीवरील मर्यादा निश्चित केली आहे.
१ मेपासून पुढचे आदेश येईपर्यंत इंधन विक्रीवरील मर्यादा कायम राहणार आहे
दुचाकी वाहनांसाठी २०० रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी ५०० रुपयांपर्यंतचं इंधन खरेदी करता येणार आहे.
याशिवाय पेट्रोल पंपांनाही सूचना करण्यात आल्या आहेत. बसलाही एका दिवसात ६० लिटर डिझेल विक्री करण्याचे निर्देश दिले आहेत.
मिनी बस आणि लहान वाहनासाठी अनुक्रमे मिनी बस ४० आणि १५ लिटरची मर्यादा घालण्यात आली आहे.
Carrot Juice: रोज सकाळी प्या गाजराचा रस, निरोगी राहाल