Surabhi Jayashree Jagdish
माशाच्या कालवणाचा वास भांडी, ताट किंवा कढईला खूप सहज लागतो आणि साध्या साबणाने धुतल्यावरही जात नाही. हा वास तेलकटपणा, मसाले आणि माशाच्या नैसर्गिक वासामुळे पृष्ठभागावर चिटकून राहतो.
सोप्या घरगुती उपायांनी हा हट्टी वास पूर्णपणे नाहीसा करता येतो. खाली दिलेल्या टिप्स वापरल्यास कोणतंही भांडे पुन्हा नवीन असल्यासारखं स्वच्छ दिसेल.
भांड्यावर लिंबाचा रस चोळून ५ मिनिटं तसेच ठेवावं. लिंबातील सिट्रिक अॅसिड वास आणि तेलकटपणा कमी करते. नंतर कोमट पाण्याने धुतल्यास वास पूर्णपणे जातो.
बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट तयार करून भांड्यावर लावा. १० मिनिटांनी हलक्या हाताने घासावे. हा उपाय वास शोषून घेतो आणि ताट-कढई चमकदार करतो.
थोडं व्हिनेगर ताटावर टाकून स्पंजने नीट पसरवा. व्हिनेगरचा नैसर्गिक अॅसिडिक गुण माशाचा वास तत्काळ कमी करतो. नंतर साबणाने धुतल्यास भांडे ताजं सुगंधी वाटते.
मीठ हा उत्तम नैसर्गिक स्क्रबर मानला जातो. भांड्यात मीठ टाकून गरम पाण्यात भिजवून ठेवा. १५ मिनिटांनी धुतल्यास वास आणि चिकटपणा दोन्ही दूर होतात.
थोडी कोरडी कॉफी पावडर ताटावर किंवा कढईवर रगडा. कॉफीचा तीव्र सुगंध घाण वास शोषून घेतो. हा उपाय धातूच्या भांड्यांवर खूप चांगला काम करतो.
स्टील किंवा लोखंडी कढईला हलका गरम करून साबण-पाण्याने धुवा. गरम केल्याने चिकटलेला मसाला आणि दुर्गंधी सैल होऊन पटकन निघून जातात. मात्र नॉनस्टिक भांड्यांसाठी हा उपाय टाळावा.