Surabhi Jayashree Jagdish
स्वयंपाक बनवणं ही एक कला असून आपल्या प्रत्येकाच्या घरी स्वयंपाक बनतो.
आपण जुना काळ पाहिला तर लोखंडाच्या भांड्यांमध्ये स्वयंपाक केला जायचा.
लोखंडाच्या कढईमध्ये जेवण शिजवल्यामुळे आपल्या शरीरामध्ये लोहाचं पुरेसं प्रमाण राहतं. त्याचप्रमाणे आपल्या शरीराला याचा फायदाही होतो.
मात्र अशा काही भाज्या किंवा पदार्थ आहेत जे लोखंडी कढईमध्ये शिजवू नयेत.
लोखंडाच्या कढईमध्ये पालक, टोमॅटो, बीट कधीच शिजवू नये, असं म्हटलं जातं.
ज्या भाज्यांमध्ये व्हिटॅमिनचं जास्त प्रमाण आहे, अशा भाज्या लोखंडी कढईमध्ये शिजवू नयेत.
लोखंडी कढईमध्ये अंड किंवा त्याचे पदार्थ बनवू नयेत, असंही म्हटलं जातं.