Dhanshri Shintre
नवरात्रीच्या सुरुवातीला देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. या दिवशी तिला मुख्यतः तूपाचा नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले जाते.
नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी रूपाची पूजा केली जाते. या दिवशी साखर किंवा मिश्री अर्पण केल्यास देवी प्रसन्न होते आणि सर्व इच्छा पूर्ण होतात.
नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी भक्तांनी माँ चंद्रघंटाला प्रसन्न करण्यासाठी खीर आणि इतर दुग्धजन्य पदार्थांचा नैवेद्य अर्पण करावा, जे धार्मिक मान्यतेनुसार शुभ ठरते.
नवरात्रीच्या चौथ्या दिवशी देवी कुष्मांडा ची पूजा केली जाते. या दिवशी तिला आवडणारा मालपुआ अर्पण केल्यास तिचा आशीर्वाद जलद प्राप्त होतो, असे मानले जाते.
नवरात्रीच्या पाचव्या दिवशी आई स्कंदमातेची पूजा करून तिला प्रसन्न करण्यासाठी भक्तांनी विशेषतः केळी अर्पण करावी, जे धार्मिक मान्यतेनुसार शुभ आणि फलदायी मानले जाते.
नवरात्रीच्या सहाव्या दिवशी देवी कात्यायनीची विधिपूर्वक पूजा केली जाते. भक्तांनी या दिवशी तिला विशेषतः मध अर्पण करणे शुभ आणि प्रसन्नता देणारे मानले आहे.
नवरात्रीच्या सातव्या दिवशी देवी कालरात्रीची विधिपूर्वक पूजा करताना तिला गुळापासून तयार केलेले नैवेद्य अर्पण करणे शुभ आणि प्रसन्नता देणारे मानले जाते.
नवरात्रीच्या आठव्या दिवशी देवी महागौरीची विधिपूर्वक पूजा केली जाते. भक्तांनी या दिवशी तिला नारळ किंवा नारळापासून बनवलेले नैवेद्य अर्पण करणे शुभ मानले आहे.
नवरात्रीच्या नवव्या दिवशी देवी सिद्धिदात्रीची पूजा विधीपूर्वक केली जाते. या दिवशी हलवा, पुरी आणि चणे अर्पण केल्यास संपूर्ण वर्षभर यश आणि सिद्धी प्राप्त होते.
NEXT: नवरात्रीत देवीच्या कोणत्या नऊ रूपांची पूजा करतात? वाचा इतिहास आणि धार्मिक वैशिष्ट्ये