ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
नागपंचमीच्या दिवशी अनेक जण व्रत ठेवतात. महिला या खास भावांसाठी उपवास करतात.
सत्येश्वरी नावाची देवी होती जिचा सत्येश्वर हा भाऊ होता. त्याचा मृत्यु नागपंचमीच्या आदल्या दिवशी झाला.
भावाच्या शोकात सत्येश्वरीने अन्न सोडले होते दुसऱ्यादिवशी नागाच्या रूपात तिला सत्येश्वर दिसला यामुळे तिने नागाला आपला भाऊ मानला
सत्येश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल, असे नागदेवतेने वचन दिले.
तेव्हापासून नागपंचमीला स्त्रिया नागाची पूजा करतात व नागपंचमीच्या दिवशी भावासाठी उपवास करतात.