Dhanshri Shintre
मुंबई ही फक्त समुद्रकिनारे आणि सेलिब्रिटींची शहर नाही, तर ऐतिहासिक वारसाही जपणारे ठिकाण आहे. इथे अनेक प्राचीन किल्ले असून, पर्यटक त्यांचा इतिहास आणि सौंदर्य पाहण्यासाठी भेट देतात.
स्वप्नांचे शहर मुंबई आपल्या मोहक सौंदर्यामुळे आणि उत्साही जीवनशैलीमुळे सर्वांना भुरळ घालणारे अद्भुत ठिकाण आहे.
दिल्ली-जयपूरप्रमाणे मुंबईतही भेट देण्यासारखे अनेक ऐतिहासिक किल्ले आहेत, पण समुद्र पर्यटनामुळे अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात.
मुंबईत समुद्रकिनारे आणि शाहरुख खानचे ‘मन्नत’ पाहताना, अनेक ऐतिहासिक किल्ल्यांची भेटही निश्चितच तुमच्या यादीत असावी.
कॅस्टेला डी अगुआडा, म्हणजेच वांद्रे किल्ला, मुंबईच्या वांद्रे भागात स्थित पोर्तुगीज काळातील दुर्ग आहे. समुद्रकिनारी असलेले हे ठिकाण "दिल चाहता है"सारख्या चित्रपटांच्या चित्रीकरणासाठीही प्रसिद्ध आहे.
मुंबईतील हा ऐतिहासिक किल्ला अनेकांना माहित नसला तरी महत्त्वाचा आहे. ब्रिटिशांनी समुद्री शत्रूंवर नजर ठेवण्यासाठी बांधलेला हा दुर्ग रोज सकाळी ५ ते संध्याकाळी ७ पर्यंत खुला असतो.
वसईतील विशाल बासीन किल्ला पोर्तुगीज काळात बांधला गेला आणि ११० एकर परिसरात विस्तारलेला आहे. अनेक चर्च आणि इमारतींचा हा ऐतिहासिक दुर्ग आजही आकर्षक अवशेषांमुळे प्रसिद्ध आहे.
मराठा काळात बांधलेला डोंगरी किल्ला 360-डिग्री निसर्गसौंदर्य देणारा दुर्ग आहे. समुद्रकिनारी असलेल्या या ठिकाणावरून वसई किल्ला, बोरिवली उद्यान आणि एस्सेल वर्ल्ड परिसर दिसतो.
मुंबई बंदरातील हा किल्ला आजही तेल शुद्धीकरण प्रकल्प आणि विशाल गॅस टाक्यांचे अवशेष जपून ठेवतो. पर्यटक येथे स्पीडबोटीद्वारे सहज पोहोचू शकतात.